शुक्रवार, १६ ऑक्टोबर, २०१५

रेखा

रेखा एक लकीर है 
रेखा एक मर्यादा है 
रेखा एक तहजीब है 
रेखा एक इशारा है 

रेखा फूटते हुए सागर का अचल किनारा है 
रेखा ढलते हुए शाम की ओजस चेता है 
रेखा किसीको रोक सकती है 
लेकिन अपने आप मैं समेट नहीं सकती है 
क्यूंकि रेखा तो द्विमितीय होती है 
अपनी भावनाओंकी गहराई नाप नहीं सकती है 
दो बिन्दुओंको जोड़ तो सकती है 
लेकिन अपने आप में एक आकार नहीं बन सकती है 

रेखा रक भ्रम है 
रेखा एक व्यथा है 
रेखा एक सम्भ्रम है 
रेखा एक वेदना है 

रेखा दिल को छेदनेवाला तीर है 
रेखा सरगम छेडनेवाली तार है 
रेखा की मर्यादा को कोई सीमा नही है 
रेखा दो बिन्दुओंके बीचकी शोकान्त कहानी है 
क्यूंकि रेखा तो द्विमितिय है 
भावनोंकी की गहराई छुपा नहीं सकती है 
अंत:हीनताका श्राप लिए ढूंढ रही है
पूर्ण बनानेवाली वो तीसरी मिति कहाँ है 




माहिती युग!

माझ्या भावनांचे मूल्य 
दोन दिवस, बारा फौरवर्डस आणि सत्तर लाईकस!
आणि त्यानंतर त्या ढकलल्या जाणारच असतात 
या जगड्व्याळ माहितीच्या जाळ्याच्या 
सूक्ष्मतम कोपऱ्यामध्ये 
आणि म्हणे त्या शोधून बाहेर काढता येतात 
कोणत्याही क्षणी, केवळ कुंजी पटलाच्या इशाऱ्याने!
आजकाल, कोण दु:खाचा शोध घेतो मुद्दाम
तेही दुसऱ्याच्या?
पाचव्या युगाच्या निर्मितीचे दिंडीम वाजू लागले आहेत 
भावनांचे माहितीकरण मोठ्या वेगात सुरु झाले आहे 
माहिती युग!

सोप्प


सोप्प बोलायचं, ठरलंच आहे 

अवघड शब्दांचे, अवघड प्रश्न 
घालायचेच नाही, ठरलंच आहे 
मागे वळून, लांब जाताना 
बघायचच नाही, ठरलच आहे 

आता पिंजऱ्यातच कोंडून घ्यायच,
नाही कधी कुढायचं, ठरलंच आहे 
कातरवेळी, उदास संध्याकाळी
हसतच राहायचं, ठरलच आहे 

भातुकलीचा पसारा आवरून
चट्टामट्टा करायचा, ठरलंच आहे 
खेळ कधी मांडलाच नव्हता
असच घोकायच, ठरलंच आहे 


सोप्प जगायच, गुंतू जायच 
अळूचे पान व्हायचठरलंच आहे 
मला देणे नाही, मला घेणे नाही 
सन्यस्त व्हायच, ठरलंच आहे 

आशावादी अपेक्षांचे, काटेरी किनारे 
अलगद टाळायच, ठरलच आहे 
वादळ पाहून, गलबत लोटायच
शीडासकट फाटायच, ठरलच आहे 

रविवार, १० मे, २०१५

नवा देव


दगडाला शेंदूर फासून पूजतात 
तेंव्हा त्याला म्हणतात हनुमान 
दगडाला जेंव्हा नुसतेच पूजतात 
तेंव्हा त्याला म्हणतात सलमान 

रविवार, २६ एप्रिल, २०१५

भूकंप

पोटाची भाकर झोपेची साखर 
गाडली गेली ती अभागी पाखर 
सगेही गेले आता मृत्यूच सोयरा 
मर्तीकाला फुटे गर्दीचा धुमारा 

राख झाला हिरवा संसार 
दुर्दैवाचे सारे दशावतार 
भोगले सारे भोगुनी उरले 
मराठवाड्याचे दैन्यच सरले 

अबबबब ब केवढा जमला हा पसारा 
मेल्यावरच पाझरे माणुसकीचा झरा 
काय सांगू या दरबाराची कथा 
फक्त टोपलीत आमच्या व्यथा 

साऱ्या आयुष्याची झाली माती 
मातीमध्येच मरण आले हाती 
आभाळच फाटले कसा शोधू निवारा 
जमीनच देईना तिच्या लेकरा आसरा 

धनी म्हणे आता काही नको शोधू 
मेल्या पोरीमध्ये उगा जीव ओतू 
तिच्या जन्माचं तर सोन झालं 
जगण्यापरी त्यान बोलावलं  

- राहुल गुणे 

(नेपाळ भूकंप आणि किल्लारी भूकंप या घटना जरी वेगळ्या असल्या तरी मूळ वेदना एकाच आहे …किल्लारीच्या भूकंपानंतर २ दिवसांनी (२ ऑक्ट १९९३) लिहिलेली हि कविता सहज आठवली म्हणून टाकतो आहे ….  )

शनिवार, २५ एप्रिल, २०१५

मराठी माणूस



सदाशिवरावभाऊनी दिल्लीचे तख्त फोडल्याच्या आनंदाला 
पानिपतचा पराभव विरजण लावतो 
संयुक्त महाराष्ट्राचा कलश डोक्यावर घेऊन नाचताना 
बेळगाव कारवार चा डाग मनामध्ये सलतो  

मराठी मराठी माणूस दुसरा काय असतो …

चर्चगेट लोकलच्या दांडीला लोंबकळून डुलकी काढताना 
चढलेल्या सेन्सेक्सच्या गप्पा मी फक्त ऐकतो 
चिरंजीवांच्या गणिताच्या प्रगतीचा उतरत आलेख बघताना 
भविष्यातल्या नोकरीच्या चिंतेने रात्ररात्र जागवतो 

 मराठी मराठी माणूस दुसरा काय असतो …

मेनूकार्डावर काहीही न लिहिणाऱ्या उडप्याकडे मी पाठ फिरवतो 
आणि माझ्यापरीने महाराष्ट्रधर्म जागवतो 
तांबे-चितळे-पणशीकर यांच्याकडे हट्टाने खरेदी करताना 
पाट्या सूचना अपमानातून मराठी बाण्याचे धडे गिरवतो 

मराठी मराठी माणूस दुसरा काय असतो …

धीरूभाई अंबानींचे चरित्र मी विकत घेऊन वाचतो 
शेजारचा शहा त्याचे परीक्षण माझ्याकडून ऐकतो 
दिवाळीच्या लाक्षामिपूजानाला तो दहा हजाराची लड लावतो 
मी लवंगी फटका एक एक उडवतो 

मराठी मराठी माणूस दुसरा काय असतो …

सचिन शून्यावर आउट झाला तरी तो सर्वश्रेष्ठच असतो 
मराठी हद्दपार झाली तरी मी मुंबईवर प्रेम करतो 
सातासमुद्रापलीकडे अटटाहासाने जमून मंडळ संस्था काढतो 
छोटे छोटे प्रश्न तत्वाचे बनवत ई-मेल वरून वाद घालतो 

मराठी मराठी माणूस आणखी वेगळा काय असतो …

शुक्रवार, २४ एप्रिल, २०१५

- मीही कधीकधी


वेळ गाठण्याच्या नादात आजकाल 
तोडतो सिग्नल मीही कधीकधी 
परिस्थितीच्या रेट्याला शरण जाताना 
प्रवाह पतित होतो मीही कधीकधी 

पेपर वाचताच रद्दीत घालताना 
वर्तमानाशी संबंध तोडतो मीही कधीकधी 
उड्डाण पुलावरून भरधाव वेगात जाताना 
खालच्या जगाकडे दुर्लक्ष करतो मीही कधीकधी 

सण साजरे करण्याच्या जोशात 
देवालाच विसरतो मीही कधीकधी 
धूळवडीचे रंग उत्साहात उधळताना 
आरशाला विसरतो मीही कधीकधी 

वेगवेगळ्या वादांच्या कोलाहलात 
संवाद विसरतो मीही कधीकधी 
अत्माग्लानीच्या नशेमध्ये जगताना 
आत्मभान विसरतो मीही कधीकधी 

राहतो जरी माणसांच्या जगात 
माणसालाच विसरतो मीही कधीकधी 
जगण्यासाठी श्रमण्याच्या नादात 

जगणेच विसरतो मीही कधीकधी 

शुक्रवार, ४ फेब्रुवारी, २०११

काही चारोळ्या....


२ G आणि काही लाखो करोडो रुपये...
 
सर्व "निधी" मोजून झाल्यावर 
त्यांना जनतेची "करुणा" आली 
आपल्या डोळ्यात धूळ फेकण्यासाठी 
शेवटी "राजांना" अटक झाली
 
काळ सोन - "तेल तेल आणि तेल..."
 
शेषशायी विष्णूला जागवण्यासाठी
शंकरापाठी भस्मासुर लागला
गृहखात्याला जाग येण्यासाठी
मनमाडमध्ये सोनावणे जळला
 
वाटमारीच्या वाटणीवरून वाद आहे
तडजोडीसाठी माफिया तुरुंगात आहे
"मारी" ची रक्कम ठरल्यानंतर
जामिनाची "वाट" मोकळी आहे
 
 
(सैफुद्दीन डागर - धृपद गायक गेली पंचवीस वर्षे मंजूर झालेले (कागदावर) घर मिळवण्यासाठी झगडत आहेत)
 
सुरांनी मनात बांधतात घर
त्यांना मिळतो सरकारी कागद
ज्यांच्या कागदात असतो दम
त्यांना मिळते "आदर्श" घर

शुक्रवार, ३१ डिसेंबर, २०१०

जिजावूंची सत्वपरीक्षा (निमित्त दादोजींचा पुतळा हलवणे वगैरे वगैरे....)

स्वर्गात चालता चालता जिजावूना  सीतामाई भेटल्या
कल्पवृक्षाच्या पारावर बसून दोघी हितगुज करू लागल्या

'खालचा प्रकार कळला आणि मी धावत धावत आले
जुने झाले तरीही माझे अनुभव, गाठीशी असलेले बरे'

'बर झाल माई तू भेटायला आलीस
तुझ्यापुढे माझे दुःख काहीच नाही' 

सीतामाई खिन्नपणे हसली आणि बोलली शून्यात पाहून
'चिरंतन अविश्वासाच्या यज्ञात किती समिधा जाणार जळून
आधी अग्निदिव्यात जाळली,  नंतर टाकली वनात,
तरीही जिवंत राहिले  म्हणून बसविली गाभाऱ्यात'

'माई, तरी तुझ बर होत, तू त्यांच्यासमोर होतीस
तुला पोटात घ्यायला तुझी आई, स्वतः जमीन होती
स्वर्गात बसून चारित्र्याचा, खटला आता लढते आहे
हिंदवी स्वराज्यापेक्षाही, कुंकवाची पुण्याई सांगते आहे
आपल्याच मुलांचं अधःपतन कुठवर सहन करायचं
पुतळ्याच्या राजकारणावर आपल्याच आईच शील जाळायच?'

अश्रू डोळ्यातले पुसून सीतामाई बोलली मनापासून
'ही चूक माझीच आहे,
हजारो वर्षे जुनीच आहे 
म्हणूनच सीता जिजामाता 
सत्वपरीक्षा देत आहेत
ही चूक माझीच आहे,
हजारो वर्षे जुनीच आहे 
अग्निदिव्यात जळता जळता
आले होते एकदा मनात
रामालाही ओढावे का हाताला धरून
जळायला आत
तोही राहिला नव्हता का,
असाच एकटा वनात?'